कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडयानंतर परिवर्तन यात्रा पश्चिम महाराष्ट्रात..
राष्ट्रवादीचा झंझावात सुरु...
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन यात्रा दि. २८ जानेवारीपासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये दाखल होणार असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली. २८ ते ३० जानेवारीपर्यंत ही निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा असणार आहे. कागल, मुधोळ, कोल्हापूर शहर, शिरोळ, कराड, रहिमतपूर, फलटण, पंढरपूर, अकलूज याठिकाणी जाहीर सभा होणार आहेत.
कोकणातील रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेवून आणि राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेत व महाड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून परिवर्तन यात्रेची सुरुवात झाली. त्यानंतर उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील बुलढाणा जिल्हयात आणि मराठवाडा याठिकाणी जाहीर सभा झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेतील जाहीर सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ही परिवर्तन यात्रा पश्चिम महाराष्ट्रात २८ जानेवारीला दाखल होणार आहे.
या परिवर्तन यात्रेत महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या कराड येथील समाधीस्थळी जावून अभिवादन केले जाणार आहे.