शिवाजी पार्क येथे रंगणार इनडोअर क्रिकेटचा जल्लोष

मुंबईकर क्रिकेटप्रेमींना आता पारंपरिक क्रिकेटसोबतच वेगवान, आक्रमक आणि थरारक इनडोअर क्रिकेटची भन्नाट मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. महामुंबई इनडोअर क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे २२ ते २४ मे २०२६ दरम्यान भव्य ‘महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले असून, दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क परिसरातील पार्क क्लबच्या अर्बन स्पोर्ट टर्फवर क्रिकेटचा हा नवा अवतार रंगणार आहे. २२ मे रोजी सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत सामने रंगणार आहेत. तर २३ आणि २४ मे रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून सामने खेळवले जाणार आहेत. इनडोअर क्रिकेटच्या भन्नाट फॉरमॅटमुळे प्रेक्षकांना प्रत्येक चेंडूवर रोमांच अनुभवायला मिळणार आहे.

८ षटकांचा वेगवान आणि रोमांचक फॉरमॅट

कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक संघात १२ खेळाडूंचा समावेश असणार असला, तरी प्रत्यक्ष मैदानावर एका वेळी ८ खेळाडू खेळणार आहेत. प्रत्येक संघाला एक फलंदाजी आणि एक गोलंदाजी डाव मिळणार असून, प्रत्येक डाव ८ षटकांचा असेल. विशेष म्हणजे, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील प्रत्येक खेळाडूला एक षटक टाकणे बंधनकारक असेल. दुखापतीचा अपवाद वगळता कोणालाही एकापेक्षा जास्त षटके टाकता येणार नाहीत. त्यामुळे केवळ ताकद नव्हे, तर अचूक रणनीती आणि वेगवान निर्णयक्षमतेची खरी कसोटी लागणार आहे.

महाराष्ट्रात इनडोअर क्रिकेटची नवी क्रांती

इनडोअर क्रिकेटचा हा नवा फॉरमॅट महाराष्ट्रात झपाट्याने लोकप्रिय होत असून, राज्यभरातून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती येथील क्रीडा आयोजकांनी लवकरच जुनिअर गटाची राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी इनडोअर क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक चेअरमन क्षितिज वेदक आणि संस्थापक सचिव बाळासाहेब (बाळ) तोरसकर यांनी दिली. मुंबईत सुरू झालेला इनडोअर क्रिकेटचा हा नवा थरार आता संपूर्ण महाराष्ट्राच्या क्रिकेट संस्कृतीत वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने झेपावताना दिसत आहे.


Most Popular News of this Week

Chembur Gymkhana Crowned Motiram Cup Champions

Chembur Gymkhana emerged the champion badminton club among men, winning the Elite Division of the Motiram Cup badminton tournament, organised by GMBA, promoted by Badminton Gurukul and hosted by...

कोकणातील आंबा, काजू उत्पादक...

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. मागील तीन महिन्यापासून या...

कोकणातील आंबा, काजू उत्पादक...

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. मागील तीन महिन्यापासून या...

कोकणातील आंबा, काजू उत्पादक...

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. मागील तीन महिन्यापासून या...

बेस्ट समिती अध्यक्षांना...

बेस्ट समिती अध्यक्षांना राजोल पाटील यांचे निवेदन; भांडुपच्या प्रश्नांकडे...

वाढत्या उष्णतेच्या...

वाढत्या तापमानाचा मुंबई महानगरातील वृक्षसंपदेवर प्रतिकूल परिणाम होऊ नये...