छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा येथील नजरकैदेतून आपल्या अद्वितीय चातुर्य, धैर्य आणि पराक्रमाच्या बळावर सुटका करून घेतलेल्या ऐतिहासिक घटनेला ३६० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आग्रा किल्ला येथे भव्य विजय उत्सव साजरा करण्यात आला.
या ऐतिहासिक सोहळ्यास स्थानिक खासदार राजकुमार चाहर, महाराष्ट्राचे मंत्री भरतशेठ गोगावले, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप, उपाध्यक्ष सत्यजित नानावटे, सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे, सहसरचिटणीस राजेश घाणेकर, महाराष्ट्र सरचिटणीस धोंडोजी जाधव, महाराष्ट्र कार्याध्यक्ष महेश सावंत, प्रवक्ते अनंत मोरे, शिवाजीराव गुणगुडे, कोल्हापूर संपर्कप्रमुख, चिपळूण संपर्कप्रमुख l किशोर घाग, मानखुर्द शिवाजीनगर तालुका अध्यक्ष मंगेश शिर्के, विजय चिकणे, श्रीधर पांचाळ तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र व मुंबईतील सर्व मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वाभिमान, दूरदृष्टी आणि राष्ट्रनिष्ठेचा आदर्श जपत समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी व्यक्त केला.