हैडलाइन

बेस्ट समिती अध्यक्षांना राजोल पाटील यांचे निवेदन; भांडुपच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष

बेस्ट समिती अध्यक्षांना राजोल पाटील यांचे निवेदन; भांडुपच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष

भांडुप परिसरातील नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात नगरसेविका राजोल पाटील यांनी बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांची कुलाबा येथील बेस्ट भवन येथे भेट घेत महत्त्वपूर्ण निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मदत तसेच नवीन बसेसची मागणी केली आहे .

या भेटीदरम्यान राजोल पाटील यांनी भांडुप परिसरात वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त करत, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी ठाम मागणी केली. विशेषतः वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील अपुरी सुरक्षितता व नियोजनाचा अभाव यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

राजोल पाटील यांनी बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांना दिलेल्या पत्रात दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी भांडुप स्टेशन रोड परिसरात झालेल्या दुर्दैवी अपघाताचा आवर्जून उल्लेख केला. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना अद्याप शासकीय मदत मिळालेली नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून देत, संबंधित विभागामार्फत ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी राजोल पाटील यांनी भांडुपसह मुंबई उपनगरातील प्रवाशांच्या दैनंदिन गैरसोयीचाही मुद्दा उपस्थित केला. प्रवाशांची वाढती संख्या व अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक सुविधांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून प्रवाशांच्या सोयीसाठी भांडुप, विक्रोळी, मुलुंड, घाटकोपर तसेच मुंबईतील विविध भागांसाठी बेस्ट बस सेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली.

राजोल पाटील यांनी सांगितले की, भांडुपकरांच्या सुरक्षिततेचा व सोयी-सुविधांचा प्रश्न हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना व मृतांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर मदत मिळाली पाहिजे. बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी राजोल पाटील यांनी मांडलेल्या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. राजोल पाटील यांच्या या पाठपुराव्यामुळे भांडुप परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Most Popular News of this Week

“हेमंत बिस्वा सरमा पुन्हा...

हेमंत बिस्वा सरमा यांनी आज सलग दुसऱ्यांदा आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ...

बेस्ट समिती अध्यक्षांना...

बेस्ट समिती अध्यक्षांना राजोल पाटील यांचे निवेदन; भांडुपच्या प्रश्नांकडे...

मुंबईच्या प्रथम नागरिक,...

मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य आणि सार्वजनिक सेवांना अधिक सक्षम, आधुनिक...

बेस्ट समिती अध्यक्षांना...

बेस्ट समिती अध्यक्षांना राजोल पाटील यांचे निवेदन; भांडुपच्या प्रश्नांकडे...