बृहन्मुंबई क्षेत्रात दोन-तीन दिवस पहाटे मुसळधार पाऊस झाला. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन अश्विनी भिडे यांनी यावेळी केले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत होती. अधिकारी व कर्मचारी वर्ग विविध ठिकाणी उपस्थित असून सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.