माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांच्या ‘India and I – A Hundred Memories, Not a Memoir’ या पुस्तकाचा मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये प्रकाशन सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला साहित्य, कला आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. अभिनेता आणि सूत्रसंचालक कबीर बेदी यांनी पुस्तकातील उताऱ्यांचे वाचन केले.
तर टीव्ही निर्माते आणि सूत्रसंचालक सिद्धार्थ काक तसेच ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका सुचेता दलाल यांच्यासोबत एस. वाय. कुरैशी यांनी पुस्तकाच्या निमित्ताने विशेष संवाद साधला.
या पुस्तकामध्ये एस. वाय. कुरैशी यांनी आपल्या सार्वजनिक जीवनातील अनुभव, भारतातील विविध घडामोडी आणि आयुष्यातील महत्त्वाच्या आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. ‘A Hundred Memories, Not a Memoir’ म्हणजेच आत्मचरित्र नसून शंभर आठवणींच्या माध्यमातून भारताचा प्रवास मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.
मुंबईतील या प्रकाशन सोहळ्याला साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून एस. वाय. कुरैशी यांच्या पुस्तकाला शुभेच्छा दिल्या.