मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. अंतरवाली सराटी येथे सरकारच्या शिष्टमंडळाची भेट होण्यापूर्वीच जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे.
आता केवळ गोड बोलून किंवा आश्वासनं देऊन चालणार नाही, तर सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
सरकारकडून वारंवार वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप करत, यापुढे असा विलंब मराठा समाज सहन करणार नसल्याचेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
सरकारचे शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्यातील बैठकीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर नेमका काय तोडगा निघतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.