हैडलाइन

“आता वेळकाढूपणा खपवून घेणार नाही”, सरकारवर मनोज जरांगेंचा हल्लाबोल

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. अंतरवाली सराटी येथे सरकारच्या शिष्टमंडळाची भेट होण्यापूर्वीच जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे.

आता केवळ गोड बोलून किंवा आश्वासनं देऊन चालणार नाही, तर सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

सरकारकडून वारंवार वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप करत, यापुढे असा विलंब मराठा समाज सहन करणार नसल्याचेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

सरकारचे शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्यातील बैठकीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर नेमका काय तोडगा निघतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Most Popular News of this Week

चेंबूरमध्ये महादेव शिगवण...

चेंबूरमधील भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक १५४ चे नगरसेवक महादेव शिगवण...

‘मेरी धारावी, मेरे...

स्वतंत्रता दिवस के मौके पर धारावी के 40 से ज्यादा स्कूलों के 1,000 से अधिक...

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस...

देश का माहौल बदल चुका है। जनता अब भाजपा-मोदी-शाह सरकार से सवाल पूछ रही है और...

तिरंगा कापताना लाज वाटली नाही...

केरळचे गृहमंत्री आणि महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी...

भारताच्या आठवणींचा...

माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरैशी यांच्या ‘India and I – A Hundred Memories, Not a Memoir’ या...

पादचारी प्रथम अभियानाच्या...

‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाच्या अनुषंगाने पादचाऱ्यांसाठी रस्ते व...