हैडलाइन

चेंबूर येथील तरुणाची तलवारीने व चाकूने वार करून हत्या करीन पळून गेलेल्या चार आरोपीना चेंबूर पोलिसांनी केली अटक!

मुंबई: चेंबूर येथील पोस्टल कॉलनी परिसरात उत्कर्ष धुमाळ नावाच्या  तरुणाची तीन सप्टेंबर रोजी जमावाने घरात घुसून हत्या केली होती. तसेच आरोपींनी तरुणाकडून रोख रक्कम, मोबाईल व बाइक देखील चोरली होती. या प्रकरणातील एकूण पाच आरोपींना चेंबूर पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा घडल्याच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी या पाच आरोपींपैकी उत्तम कडू  (वय- 26) या आरोपीस अटक केली होती. मात्र इतर चार आरोपी मुंबईबाहेर पळून गेले होते. हे आरोपी सराईत असल्याने ते वारंवार आपले ठिकाण बदलून अटक टाळत होते. गुरुवारी एका गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीनुसार हे आरोपी मुंबईमध्ये आले असून चेंबूर मध्ये एका ठिकाणी लपून बसल्याचे पोलिसांना कळाले. या आरोपींना पोलीस पकडण्यास गेले असता पोलिसांना पाहून आरोपींनी पळ काढला मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. सनी जगताप वय- 26, भगवती शर्मा वय- 29, निशांत गुंजाळ वय- 20 आणि मनीष गुंजाळ वय- 22 अशी या आरोपींची नांवे आहेत. पोलिसांनी या आरोपींकडून बाईक हस्तगत केली असून गुन्ह्याचा अधिक तपास करीत असल्याचे चेंबूर वरिष्ठ पोलिस निरीक्षका शालिनी शर्मा यांनी माहिती दिली.


Most Popular News of this Week

राज्यसभा निवडणुकीसाठी...

राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत असून महाविकास आघाडीला एक जागा...

राज्यसभेकडे पार्थ पवारांची...

राज्यसभेचा उमेदवारी अर्ज आज राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ...

राज्यसभा में दबे-कुचले वर्ग...

राज्यसभा में दबे-कुचले वर्ग की आवाज बनेंगी डॉ. ज्योति वाघमारेशिवसेना को आम...

*एएआयबीच्या अहवालावर रोहित...

मुंबई दि. 4 मार्चएखाद्या व्हीआयपीच्या किंवा कोणत्याही दुर्घटनेचा तपास होत...

पालिका अधिका-यांच्या...

पालिका अधिका-यांच्या हलगर्जीपणामुळे भांडुप विभागातील अनेक शौचालयांची...

HPCL SC 8 विकेट से जीता; आर्यन...

 पर - इंश्योरेंस शील्ड क्रिकेट टूर्नामेंटमुंबई: ओरिएंटल इंश्योरेंस...