हैडलाइन

ज्यांच्या मतांवर सत्तेत आले, त्याच शेतकरी आणि लाडक्या बहिणीना सरकार विसरले

ज्यांच्या मतांवर सत्तेत आले, त्याच शेतकरी आणि लाडक्या बहिणीना सरकार विसरले

महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प म्हणजे जनतेशी गद्दारी, कंत्राटदार मित्रांशी यारी!

मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांची महायुती सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका

मुंबई - निवडणुकीपूर्वी गाजावाजा करून गुलाबी जॅकेट धारण करणाऱ्या अर्थमंत्री अजित दादांनी सत्तेत येताच लाडक्या बहिणींशी गद्दारी केली. शेतकरी आणि लाडक्या बहिणीच्या मतांवर सत्तेत आलेल्या सरकारला आता मात्र त्यांचा विसर पडला आहे अशी टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा . वर्षा गायकवाड यांनी केली.

आजचा अर्थसंकल्पात जुन्याच घोषणा आहेत, नवीन कोणताही कार्यक्रम महायुती सरकारने जनतेसमोर दिलेला नाही, त्यामुळे कृतीहीन आणि दिशाहीन असा हा महायुती सरकारचा अर्थसंकल्प आहे,अस गायकवाड म्हणाल्या.

निवडणुकीत गुलाबी जॅकेट घालून लाडक्या बहिणीची मत मागणारे महायुती सरकार सत्ता येताच २१०० रुपये देण्याच्या आपल्या आश्वासन पासून पळत आहेत. यामुळे गरज सरो आणि वैद्य मरो अशी महायुती सरकारची नियत असल्याचं खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

इतके मोठे बहुमत मिळूनही महायुती सरकार मध्ये भ्रष्टाचार आणि आपापसातील भांडणात जनतेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. आजच्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा या कंत्राटदार आणि धनाढ्य मित्रांसाठी आहेत. तिजोरी लुटा आणि जनतेला वाऱ्यावर सोडा असेच महायुतीचे धोरण आहे. अर्थसंकल्पात ही आकड्यांचा घोळ आणि शब्दाचा खेळ करण्यात आला पण प्रत्यक्षात मात्र जनतेला वंचित ठेवण्यात आल्याची टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा.वर्षा गायकवाड यांनी केली आहे.


Most Popular News of this Week

चेंबूरमध्ये मोफत आरोग्य...

चेंबूरमध्ये नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले....

पांडुरंग विठ्ठल आमले यांच्या...

नवी मुंबईतील सानपाडा येथे साईभक्त सेवा मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव...

गोविंदांचा थरार, कलाकारांचा...

नवी मुंबईतील ऐरोली परिसरात शिवसेना प्रणित सुनील चोगुले स्पोर्ट्स...

माजी खासदार समीर भुजबळ...

एसआयआर मतदार नोंदणी मोहिमेदरम्यान पात्र असूनही ज्या नागरिकांची नावे...

मुंबईच्या महापौर रितू तावडे...

भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५...

लोकनेते आदरणीय गणेश नाईक...

मंडळाच्या भूमिकेनुसार शिरवणे गावातील स्थानिक गोविंदा पथकांच्या द्वारेच...