हैडलाइन

“टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव यांचे मुंबईत जंगी स्वागत”

टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघावर मात करून जगज्जेतेपदावर नाव कोरणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार सूर्यकुमार यादव यांचे मुंबईत जंगी स्वागत करण्यात आले. देवनार येथील त्यांचे निवासस्थान असलेल्या सोसायटीत माजी खासदार राहुल शेवाळे देखील राहतात. मंगळवारी दुपारी निवासस्थानी परतलेल्या सूर्यकुमार यादव यांचे शेवाळे कुटुंबीय आणि इतर सोसायटी सदस्यांच्या वतीने ढोलताशांच्या गजरात  स्वागत करण्यात आले.


दैदिप्यमान कामगिरीबाबत पुष्पगुच्छ आणि शाल - श्रीफळ देऊन शेवाळे यांनी त्यांचे अभिनंदन केले त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी त्यांचे औक्षण करण्यात आले. या स्वागतासाठी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 


यावेळी बोलताना राहुल शेवाळे म्हणाले की, "भारतीय संघाने क्रिकेटच्या टी 20 विश्वचषकावर आपले नाव कोरले, तो क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण होता. या जगज्जेत्या संघाचे कर्णधार सूर्यकुमार यादव आपल्या घरी परतले. त्यावेळी आमच्या सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या आणि शिवसैनिकांच्या वतीने त्यांचे स्वागत करणे, हा आमच्यासाठी भाग्याचा क्षण आहे. टीम इंडियाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा!"





Most Popular News of this Week

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

 टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (ITCSF) यांच्या वतीने आयोजित...

महिला पत्रकारांचे आरोग्य...

नवी मुंबई शहरात कार्यरत असलेल्या महिला पत्रकारांसाठी महानगरपालिकेच्या...

महाराष्ट्र बॉक्सिंग...

मुंबई, ता. 2 : महाराष्ट्राच्या बॉक्सिंग इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणारी 7 वी, 17...

उद्धवजी की विधायकी के लिए...

संजय राउत चाहते हैं कि उद्धव ठाकरे विधानमंडल में जाएं, लेकिन वे वास्तव में...

संजय राउत अपने ही पार्टी में...

अशोक खरात मामले की जांच से संबंधित जानकारी अंजली दमानिया को मुख्यमंत्री...