पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या यशस्वी १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती लाभली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत देशात झालेल्या विकासकामांचे आणि परिवर्तनाचे सविस्तर वर्णन केले. त्यांनी पायाभूत सुविधा, डिजिटल इंडिया, महिला सक्षमीकरण, गरीब कल्याण योजना, आत्मनिर्भर भारत आणि देशाच्या जागतिक स्तरावर वाढलेल्या प्रतिष्ठेचा उल्लेख केला.
तसेच त्यांनी विकसित भारताच्या संकल्पनेला अधिक बळ देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
‘वर्ष राष्ट्रनिर्माणाची’ हा संदेश देत उपस्थितांनी देशाच्या विकासासाठी आणि प्रगतीच्या नव्या वाटचालीसाठी आपली बांधिलकी व्यक्त केली. उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला."